आमदारांनी सूचना करूनही रहाटाघर बसस्थानकात समस्या कायम

रत्नागिरी :रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण असून सध्या रत्नागिरीच्या मध्यवर्ती एस.टी. बस स्थानकाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. येथे प्रवासी व कर्मचार्‍यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी प्रवाशांना व कर्मचार्‍यांना पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना अडचणी येत आहेत. याबाबत हा विषय आमदार सामंत यांचेकडे गेल्यानंतर त्यांनी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावी असे आदेश एस.टी. अधिकार्‍यांना दिले होते. परंतु याला एक महिन्याचा कालावधी उलटूनही या रहाटाघर बसस्थानकात पाण्याची कोणतीही सुविधा अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे स्थानिक आमदारानी सूचना करूनही एस.टी. अधिकारी या सूचनांचे पालन करीत नसल्याने प्रवाशांच्यात नाराजी निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button