पक्षहित लक्षात घेऊन निवडणुक लढविण्याबाबत निर्णय घेणार: नारायणराव राणे

सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीत स्वाभिमान पक्षाचे अन्य पक्षांशी बोलणी चालू असून गणपतीपूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आपली भूमिका जाहीर करेल असे राज्याचे माजी मुख्यमंत्री व स्वाभिमान पक्षाचे सर्वेेसर्वा नारायणराव राणे यांनी सिंधुदुर्ग येथे सांगितले. पक्षहीत डोळ्यासमोर ठेवून आपण निवडणूक लढवायची की नाही याबाबतचा निर्णय घेवू असेही राणे यांनी स्पष्ट केले. राणे यांनी शिवसेनेचे नेते व पालकमंत्री यांच्यावरही टीका केली. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या नियोजन समितीच्या सभा देखील वैयक्तीक कारणामुळे पुढे ढकलल्या जात आहेत याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button