बचावकार्याची बोट सांगलीत उलटली,१४ मुत्यूमुखी तर १६ बेपत्ता

सांगली : सांगलीमध्ये महापुराने थैमान घातलं असतानाच बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना बोट उलटून 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.सांगलीतील पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात महापूर आला आहे. पुरात अडकलेल्या 30 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून बोट पाठवण्यात आली होती. ब्रम्हनाळपासून खटावकडे या नागरिकांना नेण्यात येतं होतं.पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ही बोट उलटली आणि नागरिक पुराच्या पाण्यात पडले. पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे त्यात 14 जणांचा बुडून मृत्यू झाला.14 जणांचे मृतदेह सापडले असून 16 जणांचा शोध सुरु आहे. मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष, एक लहान मुलगी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button