आता रत्नागिरीकरांना पाण्याचीही टंचाई जाणवणार

एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे रत्नागिरी करांवर पाणी टंचाईची वेळ आली आहे. एमआयडीसीच्या हरचेरी धरणातील पंप पाण्याखाली गेला होता त्यामुळे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत नव्हता तर पानवल धरणानजीक येणाऱ्या पाइपलाइनवर दरड कोसळल्याने पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन खाली गाडली गेली आहे. ती काढण्याचे काम सुरू आहे.काल शीळ परिसरातही वीज नसल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. पाईपलाईन देखील काही ठिकाणी फुटली आहे. या सर्वांमुळे कालपासून रत्नागिरीकरांना काही प्रमाणात पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button