आता वाशिष्ठी व शास्त्रीनदीवरील पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट?

रत्नागिरी ः तिवरे धरण फुटल्यानंतर लोकांनी आता बहाद्दूरशेख नाका चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील पुल व संगमेश्‍वरनजिक शास्त्री नदीवरील पुल कमकुवत झाल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी श्री. सुनिल चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता श्री. विनयकुमार देशपांडे यांना या दोन्ही पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे मागणीपत्र दिले आहे.
खा. विनायक राऊत यांनी देखील अतिशय धोकादायक असलेल्या वरील दोन ब्रिटीशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करा अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button