कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल परांजपे कॅश्युला सन्मान पुरस्कार
रत्नागिरी ः रत्नागिरी येथील परांजपे ऍग्रो प्रॉडक्टस् कंपनीला कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील मोठ्या कंपनीची नोकरी सोडून राजापूर-आडिवरे या मुळ गावात येवून ऋषिकेश परांजपे व त्यांच्या पत्नी समृद्धी परांजपे या दांपत्याने आडिवरे-राजापूर येथे काजू प्रकल्प सुरू करून त्यानंतर रत्नागिरी एमआयडीसीत मोठा काजू प्रकल्प उभा करुन अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्याची दखल घेवून या कंपनीला पुरस्कार देण्यात आला. प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते ऋषिकेश परांजपे व समृद्धी परांजपे या दांपत्याने हा पुरस्कार स्विकारला.