जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुहागरात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प
गुहागर ः जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील १४ गावांतून बांधलेल्या २५ टाक्यांमधून सुमारे ३ लाख लीटर पावसाचे पाणी साठवणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर हा एकमेव तालुका असून तालुक्यात फोरोसिमेंट तंत्रज्ञानाने अशा प्रकारे सर्वाधिक २५ टाक्या बांधण्यात आल्या. राजेंद्र पौनिकर यांनी या टाक्या बांधण्यात विशेषत्वाने पुढाकार घेतल्यामुळे आम्ही तालुक्यात एवढ्या टाक्या बांधू शकतो, असे जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांनी व्यक्त केले.